सरपंच 
मुंबई

बोर्लीच्या लोकनियुक्त सरपंच अविश्‍वास मंजूर होऊनही पदावर कायम ; तहसिलदारांचा वरिष्ठांना अहवाल

महेंद्र दुसार

अलिबाग : मुरूड तालुक्‍यातील बोर्ली ग्रामपंचायत सरपंच नौशाद दळवी यांच्यावर उपसरपंच मतीन सौदागर यांच्यासाहित नऊ जणांनी टाकलेला अविश्‍वास ठराव मंजूर होऊनसुद्धा नौशाद दळवी यांचे सरपंचपद अबाधित राहिले आहे. 
सरपंच नौशाद दळवी यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव हा 7 ऑक्‍टोबर रोजी सादर करण्यात आला होता. या संदर्भात तहसीलदार गमन गावित यांनी सोमवारी (ता. 12) सदस्यांची विशेष सभा बोलावली होती.

तहसीलदार गमन गावित यांनी सांगितले आहे की, सभेत अविश्‍वास ठरावाच्या बाजूने उपसरपंचांसहित नऊ सदस्यांनी मतदान केल्याने सरपंच नौशाद दळवी यांच्या विरोधातला अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, नौशाद दळवी हे थेट जनतेतून निवडून सरपंचपद झाले आहेत. त्यामुळे आम्हाला पद रिक्त करण्याचा अधिकार नाही. मी माझ्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेतली आहे.

या सभेबाबत अहवाल हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून निकाल येत नाही, तोपर्यंत सरपंच नौशाद दळवी यांचे सरपंच पद कायम राहणार आहे, असे सुद्धा गावित यांनी सांगितले. दरम्यान, विरोधकांनी केलेले सर्व आरोप नौशाद दळवी यांनी फेटाळले आहेत. 
 

 no confidence motion against barli  sarpanch

(संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT